स्वामी समर्थ प्रकट दिन – हे वाचा श्री स्वामी समर्थांची प्रचिती नक्की येईल

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यदांच्या वर्षी म्हणजेच 2023. मध्ये हा तिथी गुरूवार 23 मार्च रोजी आहे.
“श्री स्वामी समर्थ”हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रम्हस्वरूप तिसरा अवतार आहेत.भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात.तर कुणाला भगवती देवीच्या रुपात.

चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्लकोट येथे दाखल झाले, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती याच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णवतार अवतार आहेत ,अशी मान्यता आहे.

स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले.
अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांना प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहीतीही त्यांनी स्वत: चं सांगितली आहे. शिष्य श्री बाळाप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नांवानी प्रसिद्ध होते.

स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत भक्तांच्या समस्या महाराजांना न सांगता समजतात, म्हणूनच आयुष्यात जे काय घडते ते आपल्यासाठी च योग्य असते असे मानून जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक हवा,

अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे बोधवाक्य लक्षात ठेवून आपण नेहमी सत्कर्म करत रहावे. त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात व आपण सेवेत रमून जातो त्यामुळे अहंकार, लोभ, वाद विवाद, स्वार्थीपणा आपल्या आयुष्यात येत नाही.

स्वामींचा सेवेकरी हा निर्मळ, स्वच्छ मनाचा, नेहमी पारदर्शी व्यवहार करणारा, कितीही मोठा असेल तरी अहंकार न बाळगणारा असा असतो. जीवन सुरळीत चालण्यासाठी आपल्या हातून चुका कमी होऊन जास्तीत जास्त चांगले जगता यावे

कुटुंबाच्या समृद्धीसाठी दर शनिवारी कणकेच्या तेलाचा दिवा लावून श्री हनुमंताचा मंदिरांमध्ये लावून हनुमान च्या पुढे मनोभावे राम रक्षा बोलावी. हा प्रभावी उपाय आहे. यामुळे आपल्या कुटुंबातील समृद्धी वाढते. जगण्यासाठी मदत होते. प्रगती मध्ये वाढ होते. त्यानंतर आपण आपल्या ज्ञानाचे दान केले पाहिजे.

एखाद्या गोष्टीच जर आपल्याकडे भरपूर ज्ञान असेल तर ते नेहमी सोबत शेअर केले पाहिजे कारण कळत नकळत आपल्या मुळे लोकांचे देखील चांगले होते त्यामुळे आपल्या मध्ये असं काही स्पिरिट्स असते तर ते नेहमी लोकांसोबत तुम्ही शेअर करा त्यामुळे नक्कीच फायदा होईल.

चांगल्या कर्माचे फळ चांगल्या तऱ्हेने आपल्यालाच मिळणार आहे. लक्षात ठेवा सरळ मनाचा माणूस असतो तोच माणूस आपल्या स्वामीना प्रिय असतो. समोरचा व्यक्ती किती पण चांगला असु द्यात की वाईट आपण नेहमी चांगले वागण्याचा गुण ठेवले तर त्यामुळे स्वामींची नेहमी कृपा आपल्यावर राहील.

|| श्री स्वामी समर्थ ॥

Published by marathipride.com

I am Blogger who wants spred positivity through my words

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started